वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
कै. बबनशेठ हिरालालजी सरनोत व त्यांची सुविद्य पत्नी श्रीमती. रेखाताई बबनशेठ सरनोत हे दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत सन १९९१पासून सलग सहा वेळा अपराजित राहिले.
त्यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत विश्वासाने, प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे काम करून आपल्या प्रभागातील; तसेच शहरातील नागरिकांची मने जिंकली.
आता नुकत्याच झालेल्या २०२५ च्या निवडणुकीत त्यांचे नातू श्री. अथर्व अभय सरनोत यांनी त्यांचा जनसेवेचा वारसा जपून जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवला. अथर्व यांनी आजी-आजोबांची विजयाची परंपरा कायम राखली आहे.
अथर्व सरनोत यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस खूप शुभेच्छा. अथर्व यांच्या विजयाच्या माध्यमातून सरनोत परिवाराने नगर परिषदेत सलग सात(७) वेळा निवडून येऊन दौंड शहरात इतिहास घडवला आहे!

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























