अख्तर काझी
दौंड : संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. शिवभक्त तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खटी यांच्या आयोजनाने याच अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या शिवभक्तांना आज दौंडकरांनी निरोप दिला व त्यांची पवित्र यात्रा निर्विघ्न पणे पार पडावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे ,बादशहा शेख, योगेश कटारिया, मा. उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे तसेच विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नगरसेवक बबलू कांबळे ,शहानवाज पठाण, अमोल काळे तसेच मा. नगरसेवक अरुणा डहाळे, हरिभाऊ ठोंबरे ,रुपेश बंड ,मोहन नारंग ,बाबा पवार ,नामदेव राहिंज ,संदीप बोराडे, विशाल माशाळकर, सतीश सोनोने, तुषार कोळी ,रवी पवार, जावेद सय्यद, राजेंद्र गोलांडे ,मंत्री, दिलीप डहाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
सलग 25- 30 वर्ष अखंडपणे राजेंद्र खटी अमरनाथ यात्रेचे आयोजन करीत आहेत आणि दौंडकर शिवभक्तांकडून सुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. अमरनाथ यात्रेच्या प्रारंभापासून ते शिवभक्त स्वगृही परतेपर्यंत राजेंद्र खटी व त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांची काळजी घेतली जाते. शिवभक्तांची अमरनाथ यात्रा सफल पणे घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
दौंडकर शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रा घडवून आणण्याची परंपरा अशीच अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी राजेंद्र खटी म्हणाले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























