वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड : शहरातील सरपंच वस्ती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान काढण्यात आलेले उंबराचे झाड पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत पुन्हा लावण्यात आले. हे झाड वरद विनायक सोसायटीमधील मोकळ्या जागेत यशस्वीरित्या पुनर्लावणी करण्यात आले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कामासाठी सौ.सरिताताई गौरव कुल यांनी विशेष पुढाकार घेत मोलाची मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांनी एकत्र येत झाडाचे योग्य पद्धतीने स्थलांतर करून ते सुरक्षितपणे नव्या ठिकाणी लावले.
या उपक्रमात गौरव कुल, रोहन दुबे, अभिजित पवार, वरद जगदाळे, योगेंद्र बोडखे, महेश थोरात आणि सागर कुंभार यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सहकार्य केले. तसेच वरद विनायक सोसायटीचे लोंढे साहेब, पवार सर आणि इतर सहकारी देखील यावेळी उपस्थित होते.
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर झाडांची तोड टाळणे आणि शक्य तिथे त्यांचे पुनर्लावणी करणे ही काळाची गरज बनली आहे. सरपंच वस्तीतील नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























