दौंड ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश बागल
भारत देशातील महाराष्ट्राच्या राज्यसभेतील ७ जागेसाठी निवडणूक २०२६ होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी ०५. ०३. २०२६ रोजी मुंबईत विधान भवनात येऊन उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ०५ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. महाराष्ट्र लोक काँग्रेस संस्थापक अध्यक्ष उमेश महादेव म्हेञे यांनी मुंबईतील विधान भवनातील दालनात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.विलास गो. आठवले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सिमा तांबे याच्याकडे उमेदवारी अर्ज व १०, ०००रु.डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला आहे. राज्यसभेतील निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वात कमी वयाचा उमेश म्हेञे उमेदवार ठरला आहे. म्हेत्रे हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागील कारण म्हणजे उमेश म्हेञे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. संविधानाने मलाही अधिकार दिला आहे, त्यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज १५ दिवस पळून सर्व कागदपत्रे गोळा करून अर्ज दाखल करताना जोडून दिले आहेत. जे आमदार मुंबईतील विधान भवनातील पायर्यावर नतमस्तक-फोटो काढतात ती सर्व प्रकिया म्हेत्रे यांनी पूर्ण केली आहे. पुर्ण विधान भवनास फेरी मारून पास जमा करून विधान भवनाबाहेर आले होते. राज्यसभेतील निवडणुकीसाठी फाॅर्म भरण्याचे कारण म्हणजेच आता विधानसभेत निवडून येत तोपर्यंत मतदारराजास सर्व आमदार बोलतात शेतकरीवर्गास अच्छे दिन आणू पण निवडून आले की आमदार साहेबांना मुंबईतील हवा लागलीकी सर्व शेतकरीवर्गातील आमदार शेतकरी-कामगार-कष्टकरी-विद्यार्थी-महिला याचे हित विसरून जातात शेतकरीवर्गाच्या शेतमाल ऊस,कांदा, सोयाबीन, कापूस, तुर, संञा याच्या बाजारभावासाठी विधानसभेत भांडून शेतकरीवर्गास जास्त पैसे मिळतील हे हित बघत नाहीत सर्व आमदार मुंबईत मिळून मिसळून राहतात महाराष्ट्रात २००९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.हे बदलण्यासाठीच मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडून आल्यानंतर दिल्लीतील संसदेत शेतकरीवर्ग मालास ४ रू.जास्त मिळण्यासाठी वेळोवेळी भांडणार आहे वेळप्रसंगी आंदोलनही संसदेबाहेर करणार आहे. असे उमेश म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत आपले मत व्यक्त केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























