वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : नसरापूर येथील चिमुकलीला न्याय मिळावा तसेच संबंधित आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दौंड शाखेच्या वतीने दौंड तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
समाजात अशा अमानवी आणि संतापजनक घटनांना आळा बसावा तसेच पीडितेला न्याय मिळावा, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी ओंकार तीखे (टीसी कॉलेज को-इन्चार्ज), मल्हार काकडे (वसंतराव पवार विधी महाविद्यालय उपाध्यक्ष) तसेच अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित प्रकरणात तातडीने न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























