वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — नुकत्याच पार पडलेल्या दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडून प्रभाग क्रमांक ४ ब मधून रुचिता रुपेश कटारिया यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातील मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाला असून हा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रभागाच्या सर्वांगी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे सांगताना रुचिता कटारिया म्हणाल्या की, नागरिकांच्या मूलभूत गरजा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर विकासकामांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध राहण्याचा आपला प्रयत्न राहील, लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याचा संकल्प व्यक्त करत, जनतेच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाचे २६ पैकी १७ जागी उमेदवार निवडून आले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























